अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच एअर इंडियाचे विमान खाली कोसळले. या विमानात २४२ प्रवाशी होते. अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या विमान अपघातात सांगोला तालुक्यातील हातीद येथील दाम्पत्याचा मृत्यू झाला. ते मुलाला भेटण्यासाठी लंडनला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.
अहमदाबादमध्ये आज झालेल्या भीषण विमान अपघातात सांगोला तालुक्यातील हातीद गावाचे मूळ रहिवासी असलेले महादेव पवार आणि त्यांच्या पत्नी आशा पवार या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लंडनला मुलाला भेटण्यासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. पवार कुटुंब हे सध्या अहमदाबादमध्ये स्थायिक झाले होते. कारण त्यांचा एक मुलगा अहमदाबादमध्ये राहतो. तर दुसरा मुलगा लंडनमध्ये बेकरीचा व्यवसाय करतो.
त्यांच्या लंडनमध्ये राहणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी हे दोघेजण जात होते. हे दोघे पती-पत्नी अपघातग्रस्त विमानातून प्रवास करत होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. या अपघाताच्या अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच महादेव आणि आशा पवार हे दोघे त्यांच्या मूळ गावी हातीद येथे भावांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीनंतर काही दिवसांतच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने हातीद गावावर शोककळा पसरली आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक