‘मी राजीनामा द्यायला तयार’, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य

0

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावात जावून गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी गावकऱ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचं मोठं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार असाल तर आपण राजीनामा देवून पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं नाना पटोले म्हणाले. “मारकडवाडीतील ग्रामस्थांना सलाम करायला इथे आलोय. पाकिस्तान, श्रीलंका या देशातील लोकशाही संपुष्टात येत आहे. आमच्या देशात पण EVM द्वारे आमचे मत चोरून चालले आहे. निवडणुका झाल्या की आयोग पत्रकार परिषद घेतो. मात्र यावेळी पत्रकार परिषद घेतली नाही. आम्ही त्यावर आक्षेप घेतल्यावर त्यांनी तोडकीमोडकी उत्तरं दिली. त्यांनी रात्री 11 पर्यंत मतदान झाले, असे सांगितले मग त्याबाबत आम्ही व्हिडीओ मागितले. ते देखील आयोगाने दिले नाहीत”, असं नाना पटोले म्हणाले.

“एका आमदाराला अजून विश्वास नाही कारण ते म्हणतात मलाच माहिती नाही मी कसा निवडून आलो. 2014 पर्यंत या देशावर 55 लाख कोटींचे कर्ज होते, ते आता 220 लाख कोटींचे झाले. पूर्वी शेतकरी, कष्टकरी यांच्याकडून कर घेतला जात नव्हता. पण आता हे शेतकरी, कष्टकरी यांच्याकडून कर वसुल करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धोरणे काँग्रेसने स्वीकारली आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे कायम समर्थन केले”, असं नाना पटोले म्हणाले.

‘मी राजीनामा द्यायला तयार’

“उत्तर प्रदेशात भाजपने आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेतला आहे. आता या लोकांना मताची भीती राहिली नाही. त्यामुळे हे लोक आता राज्य विकतील. मात्र आता माझ्या मतांचा अधिकार शाबूत राहिला पाहिजे. मी 1 लाखाने निवडून येणार होतो. पण ते 2 हजारावर आले. त्यामुळे मी, उत्तम जानकर राजीनामा द्यायला तयार आहोत. आपल्या गावातील माती बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या चरणावर राहुल गांधी ही माती वाहणार आहेत. महात्मा गांधी यांच्याप्रमाणे मताच्या अधिकाराबाबत जी चळवळ होईल ती मारकडवाडीतून होईल अशी अपेक्षा आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत लवकरच वेळापत्रक तयार होईल”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“मारकडवाडीतील लोकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे लागतील. अन्यथा याचे परिणाम आगामी काळात चांगले होणार नाहीत. मला अपेक्षा आहे की हे गुन्हे मागे घेतले जातील. निवडणूक आयोगाने पोर्टल बंद केले याचा अर्थ काहीतरी घोळ आहे. मी सकाळी येणार होतो पण अतिक्रमण झाले. त्यामुळे मला यायला वेळ झाला”, असं नाना पटोले म्हणाले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here