सांगोला (प्रतिनिधी): कोल्हापूर येथून सकाळी सात वाजता कोल्हापूर –कलबुर्गी –कोल्हापूर रेल्वे सुरू करावी या मागणीचे पत्र मध्य रेल्वे विभागाचे महाप्रबंधक धर्मवीर मीना साहेब यांना शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आले.
11039 & 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर –गोंदिया या रेल्वेस जुने रेक बदलून नवीन एल एच बी अत्याधुनिक रेक देण्यात आले आहेत त्यामुळे या महाराष्ट्र एक्सप्रेसचे जुने रेक शिल्लक असल्याने कोल्हापुरातून सकाळी सत्रात सर्व थांबे रेल्वे सुरू करण्यास संधी आहे तसेच महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना आषाढी एकादशीला पंढरपूरला जाण्याकरिता या रेल्वेच्या माध्यमातून मोठी सोय होणार आहे . कोकण, कोल्हापूर ,बेळगाव ,सांगली, मिरज येथील प्रवाशांची सोय होणार आहे. यापूर्वी यासंदर्भात अनेक वेळा रेल्वे विभागाला या मागणीचे निवेदन पत्र दिले आहे .सदरील रेल्वे आषाढी एकादशी पूर्वी , व यात्रा स्पेशल बेळगाव येथून सुरू करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. या निवेदनाच्या प्रती खासदार धैर्यशील मोहिते पाटील, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुणे, सोलापूर यांनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी अशोक कामटे संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र एक्सप्रेसचे अप– डाउन रेक शिल्लक असल्याने कोल्हापूर –कलबुर्गी–कोल्हापूर रेल्वे सुरू करण्यास रेल्वे प्रशासनाला कोणतीच अडचण नाही, सध्या पुणे रेल्वे विभागाकडे या गाडीचे 1 जून पासून रेक उपलब्ध असल्याने तूर्तास ही गाडी सुरु होण्यास कोणतीही अडचण नाही, त्यामुळे कोकनातील भाविकांना पंढरपूर, तुळजापूर ,अक्कलकोट, गाणगापूर दर्शन करून या रेल्वेने परतीच्या प्रवासाकरता सुलभ सोय होणार आहे तरी मध्य रेल्वेने ही रेल्वे सुरु करावी अशी मागणी होत आहे. त्याकरिता कामटे संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे.
निलकंठ शिंदे सर (अध्यक्ष: -शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना)
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक